मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी ::> तालुक्यातील सुकळी शिवारातील वन विभागाच्या हद्दीतील केटीवेअर बंधाऱ्यामध्ये पाय घसरून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २९ रोजी सकाळी ११ वाजेपूर्वी घडली.
तालुक्यातील सुकळी येथील रहिवासी आकाश बाळू पाचपोळ (वय २२) रा. हा गुरे चारण्यासाठी मंगळवारी गेला होता. ताे संध्याकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने गावातील नागरिक यांनी त्याचा शोध घेतला असता तो सुकळी वनहद्दीत असलेल्या केटीवेअर बंधाऱ्यामध्ये पाण्यात पडल्याने मृतावस्थेत आढळून आला. या प्रकरणी पोलिस पाटील संदीप इंगळे यांचे फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार सुधाकर शेजोळे करत आहेत.